Monday 19 September 2016

वाट

वाट

सरळ तर कधी नागमोडी 

वाट तशी अवघड पण तरीही सोपी

घेऊन जाते आपल्याला, असतो  शेवटी, शेवट 

नसते माहित मनाला,  धरते भीती सावट

संपेल का ती वाट कधी,   मिळेल का  निवृत्ती 

का परत पाऊली पाठवेल 

इतक्यात कुठली आल्येय मुक्ती 

सुनील

०३.०९.१६

No comments:

Post a Comment